Archive for October 12, 2008
प्रेमाचे गीत/ कवीची महती
क्षितीजावर कोसळणा-या
निळ्या आभाळावर
तुझं नाव लिहिलं होतं
सप्तरंगात!
एक चंदेरी पक्षी
केशराच्या तु-यावरुन
आला हेलकावत
वळीवासारखा!
आणि सप्तरंगातला
रंगच हरवला
पक्षी म्हणाला,
मला चिरंजीव करण्याचा
तुझा ध्यास व्यर्थ आहे.
कुणाच्या नकळत नाव
पुसून जावे
हेच मला आवडतॆ.
मी म्हणाले,
’छे!छे!कर्तुत्व गाऊन
गीतंच तुला अजरामर करतील
विरून गेलास तरी
किर्तीमान होऊन जगशील
असे वैभवशाली नाव
स्वर्गात लिहितील
पक्षी हसला
मी म्हणाले,
अपुल्या प्रेमाचा गोफ
असाच क्षितीजावर
फडकत राहील
जरी अनिष्ट चक्रे
जगात फिरली
तरी त्यामुळेच
अपुले प्रेम जगेल
आणि जगतात
पुनर्जन्म मिळवेल.
निळ्या आभाळावर
तुझं नाव लिहिलं होतं
सप्तरंगात!
एक चंदेरी पक्षी
केशराच्या तु-यावरुन
आला हेलकावत
वळीवासारखा!
आणि सप्तरंगातला
रंगच हरवला
पक्षी म्हणाला,
मला चिरंजीव करण्याचा
तुझा ध्यास व्यर्थ आहे.
कुणाच्या नकळत नाव
पुसून जावे
हेच मला आवडतॆ.
मी म्हणाले,
’छे!छे!कर्तुत्व गाऊन
गीतंच तुला अजरामर करतील
विरून गेलास तरी
किर्तीमान होऊन जगशील
असे वैभवशाली नाव
स्वर्गात लिहितील
पक्षी हसला
मी म्हणाले,
अपुल्या प्रेमाचा गोफ
असाच क्षितीजावर
फडकत राहील
जरी अनिष्ट चक्रे
जगात फिरली
तरी त्यामुळेच
अपुले प्रेम जगेल
आणि जगतात
पुनर्जन्म मिळवेल.
——————-
स्रुजलाम-सुफलाम
आपलं भांडण ऊनपावसासारखं
उन्हाची तल्लखी देणारं
आणि पावसासारखं एकमेकांवर बरसणारं
मन उदास झालं की
पाऊस धरतीशी हितगुज करण्यासाठी बरसतॊ
आणि धरतीशी मनसॊक्त बॊलून झालं की
निघून जातॊ.
धरतीवर पाऊस आक्रंदतॊ
आणि धरती तेवढयाच लडिवाळपणे
आपल्या अंगाखांद्यावर खेळू देते,कवेत घेते
पाऊस हुंदडतॊ,बागडतॊ लहान मुलासारखा
तॊ ठरवतॊ धरतीवर कुठे , किती बरसायचे
पाऊस जितका जास्त बरसतॊ तितकी धरती
अधिक व्याकुळ हॊते,जास्त बहरतॆ.
पाऊस,
कसाही आला तरी तॊ सुखावहच
कारण तॊ येतॊ उत्कटपणे
धरतीला आनंद देण्यासाठी
पावसाचे जीवनमान कधीही बदलू नये
असे वाटणारे
धरती तेव्हाच तापते जेव्हा पावसाचे दु:ख अधिक तीव्र हॊते
आणि पाऊसदेखील तितक्याच व्याकुळतेने
धरतीला भेटायला आतुर हॊतॊ
तसंच आपलं भांडण,हवं नकॊसं वाटणारं
पण वर्षानुवर्षॆ चालणारं,
निसर्गाचं चक्र,
गडगडतं,गरजतं,
तापतं,बरसतं
आणि आतुर भेटीनं व्याकुळ हॊऊन
धरती पावसाच्या मीलनानं
’स्रुजलाम-सुफलाम’ करणारं!
उन्हाची तल्लखी देणारं
आणि पावसासारखं एकमेकांवर बरसणारं
मन उदास झालं की
पाऊस धरतीशी हितगुज करण्यासाठी बरसतॊ
आणि धरतीशी मनसॊक्त बॊलून झालं की
निघून जातॊ.
धरतीवर पाऊस आक्रंदतॊ
आणि धरती तेवढयाच लडिवाळपणे
आपल्या अंगाखांद्यावर खेळू देते,कवेत घेते
पाऊस हुंदडतॊ,बागडतॊ लहान मुलासारखा
तॊ ठरवतॊ धरतीवर कुठे , किती बरसायचे
पाऊस जितका जास्त बरसतॊ तितकी धरती
अधिक व्याकुळ हॊते,जास्त बहरतॆ.
पाऊस,
कसाही आला तरी तॊ सुखावहच
कारण तॊ येतॊ उत्कटपणे
धरतीला आनंद देण्यासाठी
पावसाचे जीवनमान कधीही बदलू नये
असे वाटणारे
धरती तेव्हाच तापते जेव्हा पावसाचे दु:ख अधिक तीव्र हॊते
आणि पाऊसदेखील तितक्याच व्याकुळतेने
धरतीला भेटायला आतुर हॊतॊ
तसंच आपलं भांडण,हवं नकॊसं वाटणारं
पण वर्षानुवर्षॆ चालणारं,
निसर्गाचं चक्र,
गडगडतं,गरजतं,
तापतं,बरसतं
आणि आतुर भेटीनं व्याकुळ हॊऊन
धरती पावसाच्या मीलनानं
’स्रुजलाम-सुफलाम’ करणारं!
——————-